फक्तं या रेशन कार्ड धारकांना मिळणार, आयुष्यमान भारत कार्ड

ration-card-yojana

आज आपला देश चंद्रा वर पोहचला असेल, तरी आज आपल्या देशात अश्या लोकांची संख्या ही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. जी लोकं अजूनही दारिद्य्र रेषेखाली आहेत.

या लोकांना दारिद्य्र रेषेच्या वर आण्याकरिता आपले महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणावर फायदेशीर व कल्याणकारी योजना नेहमी राबवतात.

या योजना चांगल्या प्रकारे राबण्यासाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. 

आता या योजने सोबतच देशातील रशन कार्ड धारकांना आणखी एक सुविधा दिली जाणार आहे. जर तुमच्या कडे या प्रकारचे रेशन कार्ड असेल, तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेवू शकता.

ही योजना आहे, ज्या लोकांना मोफत रेशन मिळत, त्यांना आता मोफत रेशन सोबत त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा सरकार करणार आहे.

त्यांच्या करिता मोफत उपचार सुविधा देखील सरकार घेवून आले आहे.

सरकार ने ज्या नागरिक जवळ अंत्योदय रेशन कार्ड आहे. त्यांना ही सुविधा अनिवार्य केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्या कडे अंत्योदय कार्ड आहे.

त्यांना आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचे आहे. याकरिता सरकार आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात विशेष मोहीम राबवत आहे. यामुळे आपण सर्वांनी हे कार्ड काढून घ्यावे, ही सरकार कडून विंनती करण्यात येत आहे.


हे वाचलंत का ? –

Share