पोस्ट ऑफिस बेस्ट स्कीम
![post-office-scheme-marathi](https://mahitilake.in/wp-content/uploads/2023/06/post-office-scheme-marathi.jpg)
Post office scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो.., आज आम्ही तुमच्या करिता नेहमी प्रमाणे एक फायद्याची योजना घेवून आलो आहे. ही योजना आहे, आपल्या इंडियन पोस्ट ची, जी आपल्या शेतकऱ्यासाठी खूप फायद्याची आणि मोलाची आहे.
या योजने मध्ये आपण शेतकरी दिवसाला फक्त 50 रू एवढी रक्कम गुंतवून लाखो रुपये मिळवू शकता.
चला तर मग बघूया.! नेमकी ही योजना काय आहे. आणि आपण कश्या प्रकारे या योजनेचा लाभ घेवू शकतो. ही योजना समजून घेण्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा.
आपले केंद्र सरकार तसेच राज्य सरकार हे शेतकऱ्यांसाठी खूप योजना ह्या आखत असतात. या योजनांचे एकच उद्देश राहते आपल्या नागरिकांचे भविष्य चांगले व्हावे व सुरक्षित राहावे. आणि आपण या योजनांचा लाभ घेवून आपले भविष्य आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अधिक उज्वल व सुरक्षित करू शकता.
बरेचदा आपण भविष्याची शिदोरी किंवा चिंता म्हणून LIC किंवा बँक FD या मध्ये आपले पैसे गुंतवून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतो.
याच प्रमाणे आता इंडियन पोस्ट च्या योजनांचा उपयोग घेवून तुम्ही तुमचे पैसे वाढवू शकता. ही योजना खूप नागरिकांना साठी गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग ठरत आहे.
ग्राम सुरक्षा योजना काय आहे?
ग्रामसुरक्षा योजना ही देशातील ग्रामीण भागासाठी असलेली एक योजना आहे. जी ग्रामीण भागातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे. या योजनेत लाभार्थ्याला प्रतिदिवस 50 रू गुंतवावे लागतात.
हे पैसे जरी प्रतिदिन या हिशोबाने असतील पण काळजी करू नका. तुम्हाला पैसे प्रतिदिन भरायचे नाही. तुम्हाला महिन्याच्या शेवटी पूर्ण 1500 रुपये भरायचे आहे. दर महिन्याला 1500 रुपये भरल्यास काही कालावधी नंतर तुम्हाला 35 लाख रुपये इतकी रक्कम परत मिळेल.
या योजनेत परतावा कधी मिळणार?
तुमच्या वयाचे 80 वर्ष पूर्ण झाले, की तुम्ही या योजनेचा परतावा घेवू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या पॉलिसीची संपूर्ण रक्कम 35 लाख हे दिले जातात. काही लोक या योजेअंतर्गत बरेच दा पॉलिसी पूर्ण होण्याआधीच पैशाची मागणी करतात.
19 ते 55 वर्षा मधील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करून त्याचा लाभ घेवू शकतो .
या योजनेत तुम्ही 10000 पासून ते 10 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता. आणि या गुंतवणूकीचा भरणा तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. याचा भरणा करण्यासाठी पोस्टाने चार प्रकार दिले आहेत.
यामध्ये तुम्ही एक महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला आणि वर्षाला या योजनेत भरणा करून या योजनेचा लाभ घेवू शकता.
या योजने मध्ये कर्जाची सुविधा देखील देण्यात आली आहे. योजने मध्ये कमीत कमी 4 वर्ष गुंतवणूक केल्या नंतर तुम्ही कर्जाची मागणी करू शकता.
किती वर्षां करिता किती रुपये भरावे लागतील?
55 वर्षा पर्यंत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 31.60 लाख रुपये 58 वर्षाला 33.40 लाख आणि 60 वर्षा करिता 34.60 लाख इतका परतावा पॉलिसी मैच्योर झाल्यावर मिळेल.
या योजनेच्या अधिक माहिती करिता तुम्ही पोस्ट च्या अधिकृत संकेस्थळावर जावू शकता. भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. अश्याच माहिती करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.
हे वाचलंत का ? –